सर्व ठाणेकर आणि मुंबईकर ह्यांना त्यांच्या काळजी प्रीत्यर्त..
गर्दी काही संपत नाही.............
Lockdown मुळे सर्व विस्कळित झाले, जे जिथे ते सर्वच थप्पच झाले.लोकांना मिळावा वेळेत भाजीपाला,अशी नेहमीच गर्दी झाली गोळा.
लोक गर्दी करतात म्हणून, दिवसाचा बाजार आता बंदच झाला.काय अजब टाइम आला , दिवसाचा व्यवहार आता रात्री चालू झाला.
शारीरिक स्वास्थासाठी शारिरीक व्यायाम रोजच घरी चालू झाले, अतिश्रम करणारी लोक घरात राहूनच शारिरीक स्वास्थ्य सांभाळू लागले.
पहाटे 3 वाजल्यापासून आमच्या इथे बाजार गर्दी चालू, सर्वच वस्तु आपल्याला मिळतीलच की नाही ह्यासाठी लोकांची रात्रीच लिस्ट बनवणे झाले सुरू.
अहो, रस्त्यावर दिवसा तर गर्दी दिसत नाही, त्यासाठी पोलीस पण झाले शांत. पोलिसांना माहीतच नाही, अचानक एवढी गर्दी कुठे झाली लुप्त.
कोरोना मुळे असे काही होते तसे काही होते, कोरोना झाला तरी चालेल....... पण त्याची treatment नको, मानसिकता खचली, भय आले तरी पोटासाठी जगणाऱ्या लोकांची गर्दी काही संपत नाही.
अचानक ..........एक वेळ मरण आलेले चालेल, पण कोरोना नको. असे असताही गर्दीत बाहेर जाण्याची ताकद लोकांची काही संपत नाही.
मान्य आहे आपली घरं आहेत लहान , शुध्द हवेचा शिरकाव नाही, अश्याप्रकारे मानवाची झाली कोंडी, त्याने करावे तरी काय ? असे म्हणत जरा गल्लीत एक फेरी मारून तरी येऊ असे म्हणता म्हणता गर्दी काही संपत नाही.
भूक तर सर्वांचाच आहे, काम ही सर्वांना पाहिजेत, पोट भरण्यासाठी अन्न तर लागतेच. आजही देशावर, मानवावर कितीही मोठे संकट आले तरीही कोरोनाच काय अजून कोणतीही महामारी आली तरीही ही गर्दी काही संपत नाही, ही गर्दी काही संपत नाही.
गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका, अंतर पाळा, जगाल तर सर्वच जगाल,
घरात रहा , सुरक्षित रहा.
see more