भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष आणि वेगळे महत्त्व असल्याचे मानले जाते. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. अन्य पौर्णिमांप्रमाणे कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. सन २०२० मधील वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा, असेही म्हटले जाते.